श्रीनगर – खराब हवामानामुळे स्थगित झालेली अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. काल खराब हवामानामुळे काश्मीर खोर्यातील बालटाल आणि पहेलगाम हे दोन्ही मार्ग यात्रेकरूंसाठी बंद करण्यात आले होते. हवामान सामान्य झाल्याने दोन्ही मार्ग सुरु करण्यात आले आहे. आता यात्रेकरू पुन्हा बाबा अमरनाथांच्या गुफेकडे रवाना झाले आहेत.
43 दिवस चालणारी ही यात्रा 30 जून रोजी सुरू झाली होती. कोरोनामुळे गेली दोन वर्ष ही यात्रा बंद करण्यात आली होती. मात्र, यंदा सुरू झालेल्या अमरनाथ यात्रेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी 65 हजारांच्यावर भाविक अमरनाथ यात्रेत सहभागी झाले आहेत. बाबा अमरनाथ यांची गुफा ही समुद्रसपाटीपासून 3888 मीटर उंचीवर आहे. उत्तर काश्मीरमधील बालटाल मार्ग वापरणार्यांना गुहेत पोहोचण्यासाठी 14 किमीचा प्रवास करावा लागणार आहे. तर दक्षिण काश्मीर पहलगाम मार्गाने गुहेच्या मंदिराकडे जाणार्यांना गुहेत जाण्यासाठी 4 दिवसांत 48 किमीचा प्रवास करावा करावा लागणार आहे. यात्रेकरूंसाठी दोन्ही मार्गांवर हेलिकॉप्टर सेवाही उपलब्ध आहे.