कोल्हापूर- कोल्हापूर शहराच्या वेशीवर असलेल्या रमणमळा परिसरात गव्यांचा कळप दिसून आल्याने शेतकऱ्यांसह जॉगर्स, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. त्यानंतर वनविभागाने शहराच्या हद्दीत नागाळा पार्क, जयंती नाला आणि रमणमळा परिसरात तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली आहे. कर्मचाऱ्यांकडून लाल मिरची पावडरचा धूर करून गव्यांना घालवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
वनपरिक्षेत्राधिकारी विजय पाटील यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, ‘प्राणी उसाच्या शेतात आश्रय घेतात, जिथे ते दिवसभर विश्रांती घेतात, गोड उसाचा आस्वाद घेतात आणि नंतर रात्री बाहेर पडतात. ऊस हा आवडता चारा आहे आणि ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला की हे प्राणी वनक्षेत्रातून ऊसाच्या शेतात वळतात. आमचे कर्मचारी गव्यांच्या कळपाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. एखाद्याला गवा दिसल्यास लोकांनी अराजकता निर्माण करू नये कारण एखाद्या लहानशा चुकीमुळे त्यांना त्रास होऊ शकतो. पंचगंगा नदी, वडणगे, खुपिरे, आंबेवाडी, चिखली, शिंगणापूर गावे ओलांडून हे प्राणी स्वतःहून परततील.`