नवी दिल्ली- देशात कोरोनाचे संकट हळूहळू कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात 11 हजार 499 नवे बाधित आढळले आहेत. कालपेक्षा ही संख्या कमी आहे. तर 255 जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार आज 11 हजार 499 नवे बाधित सापडले असून 23 हजार 598 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर 255 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
सध्या देशात 1 लाख 21 हजार 881 रुग्णांवर उपचार सुरू असून पॉझिटीव्हिटी रेट 1.01 टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत देशात 4 कोटी 22 लाख 70 हजार 482 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत 5 लाख 13 हजार 481 जणांनी जीव गमावला आहे.
शुक्रवारी दिवसभरात 28 लाख 29 हजार 582 डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत 177 कोटी 17 लाख 68 हजार 379 लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 1.98 कोटी पेक्षा जास्त लसी देण्यात आल्या आहेत. देशात कोविड विरोधी लसीकरण मोहीम 16 जानेवारी 2021 पासून सुरू झाली आणि पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्यांना लसीकरण करण्यात आले.