मुंबई- राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट येणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. १६ ते २२ फेब्रुवारी दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
तसेच १६ ते २२ फेब्रुवारी या दिवसांत थंडीचा कडाका पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील तापमानात वाढ झाली होती. तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत स्थिरावले होते. तीन दिवसानंतर तापमानाचा पारा पुन्हा उतरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढच्या दिवसात वायव्येकडील बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात २-४ ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. किमान तापमानात ३-५ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.