मुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ४३६ नव्या बाधितांची नोंद झाली आहे. तर, २४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, १८ हजार ४२३ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
महत्त्वाचे म्हणजे राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही. आतापर्यंत 3334 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1701 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. राज्यात आज 24 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.83 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 75 लाख 57 हजार 034 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.76 टक्के आहे. सध्या राज्यात 6 लाख 73 हजार 875 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2383 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 56 लाख 55 हजार 012 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.