वेलिंग्टन – भारत- न्यूझीलंड विरूध्दच्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय महिला संघाने विजय मिळवला आहे. आजच्या विजयामुळे क्लीन स्विपची नामुष्की टाळली आहे.
क्वीन्सटाऊनच्या मैदानावर वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताला चार सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. परंतु, मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना जिंकून भारताने शेवट गोड केला. भारताची आघाडीची फलंदाज स्मृती मंधाना (७१) आणि हरमनप्रीत कौर (६३) यांनी निर्णायक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ५० षटकांत ९ विकेट गमावून न्यूझीलंडने भारतासमोर २५१ धावांचे माफक आव्हान ठेवले. एमेलिया केरने ७५ चेंडूत ६६ धावा केल्या. तर सोफी डिवाइन (३४), लॉरेन डाउन (३०) और हेली जेन्सेन (३०) धावा केल्या. दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर वेगवान गोलंदाज मेघना सिंगने चांगली गोलंदाजी केली.
नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ५० षटकांत ९ विकेट गमावून न्यूझीलंडने भारतासमोर (India vs New Zealand) २५१ धावांचे माफक आव्हान ठेवले. एमेलिया केरने ७५ चेंडूत ६६ धावा केल्या. तर सोफी डिवाइन (३४), लॉरेन डाउन (३०) और हेली जेन्सेन (३०) धावा केल्या. दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर वेगवान गोलंदाज मेघना सिंगने चांगली गोलंदाजी केली.