निकालानंतर समीकरणे बदलणार! वळसे पाटील यांचा अंदाज

पुणे – राज्यात निकालानंतर राजकीय समीकरणे बदलू शकतात, असे विधान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उत्पादन शुल्क, कामगार आणि गृह विभागाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. राज्यात आघाडी व युती असून दोन्ही बाजूंना तीन तीन पक्ष आहेत. निवडणूक झाल्यावर आघाडी येते की युती, यापेक्षा प्रत्येक पक्षाचे किती उमेदवार निवडून येतात हे महत्त्वाचे असून त्यानंतर खरे गणित सुरू होणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. सत्ता स्थापनेसाठी बहुमत न मिळाल्यास सरकार स्थापण्यासाठी जुळवाजुळव व आकडेमोड करावीच लागणार. निवडणुकीच्या रिंगणात ६ पक्ष असल्याने गणिते जुळवायला भरपूर वाव आहे, असे वळसे पाटील यांनी म्हटले आहे.