विजयालक्ष्मी ज्वेलर्स दरोडा प्रकरण ठाणे क्राईम ब्रँचकडे सोपवावे

उल्हासनगर – उल्हासनगर शहरातील विजयालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात दरोडा टाकून ३ कोटी २० लाखांचे सोने लंपास करण्यात आले होते. या घटनेला एक महिना उलटला तरीही स्थानिक पोलिसांना या टोळीला पकडण्यात अद्याप यश आलेले नाही. हा तपास उल्हासनगर पोलिसांकडून ठाणे क्राईम ब्रँचकडे देण्यात यावा, अशी मागणी पावसाळी अधिवेशनादरम्यान स्थानिक आमदार कुमार आयलानी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक १ येथील शिरू चौकात विजयालक्ष्मी ज्वेलर्सचे दुकान आहे. हे दुकान बंद असल्याचा फायदा घेत दुकानाचा वॉचमन, त्याची पत्नी आणि त्याच्या चार ते पाच साथीदारांनी मिळून दरोडा टाकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. हे चोर फरार असून या दुकानाचा वॉचमन महेश हाच या दरोड्याचा प्रमुख सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या दुकानाच्या तिजोरीतील सोन्याची चेन, अंगठ्या, बांगड्या, ब्रेसलेट, नेकलेस, मंगळसूत्र असा ३ कोटी २० लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. ही घटना सीसीटीव्ही कैमेऱ्यात कैद झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top