देवगड – कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात सध्या हापूस आंबा बागायतदार शेतकरी वातावरणातील वाढत्या उन्हामुळे हैराण झाला आहे. उष्णतेमुळे आंबा फळांची गळती होण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे बागायतदार चिंतेत दिसत आहे.
सध्या सलग तीन टप्प्यात आलेला मोहर वाचविण्यासाठी फवारणी केली जात आहे.तर त्याचवेळी तयार झालेला आंबा काढण्याचे कामही सुरू आहे.मात्र काही दिवसांपासुन अचानक आंबा गळती होऊ लागली आहे. कच्ची कैरी समजली जाणारे आंबे गळून जमिनीवर पडत आहेत.त्यामुळे हातातोंडाशी आलेला हापूस हातात येण्याऐवजी जमिनीवर कोसळताना पाहून बागायतदार शेतकर्याचा जीव कासावीस होत आहे.