Home / महाराष्ट्र / MSRTC New Rule: एसटी प्रवाशांना मोठा दिलासा! बस बंद पडल्यास आता कोणत्याही गाडीने करा मोफत प्रवास; नियम मोडल्यास कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

MSRTC New Rule: एसटी प्रवाशांना मोठा दिलासा! बस बंद पडल्यास आता कोणत्याही गाडीने करा मोफत प्रवास; नियम मोडल्यास कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रवासादरम्यान जर एसटी...

By: Team Navakal
MSRTC New Rule
Social + WhatsApp CTA

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रवासादरम्यान जर एसटी बस नादुरुस्त झाली किंवा तिचा अपघात झाला, तर प्रवाशांना त्याच तिकिटावर मार्गावरील उपलब्ध असलेल्या कोणत्याही एसटी बसने प्रवास पूर्ण करता येणार आहे. यासाठी प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

नियम काय सांगतो?

एसटी महामंडळाच्या नियमानुसार, बस वाटेत बंद पडल्यास प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करून देणे ही महामंडळाची जबाबदारी आहे. मग ती बस साधी (लाल परी) असो, निमआराम, शिवशाही, ई-शिवाई किंवा शिवनेरी असो; प्रवासी मूळ तिकीट दाखवून पुढच्या येणाऱ्या कोणत्याही बसमध्ये चढू शकतात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे की, अशा परिस्थितीत प्रवाशांना प्रवेश नाकारणाऱ्या किंवा जादा भाडे मागणाऱ्या चालक-वाहकांवर कठोर शिस्तभंगविषयक कारवाई केली जाईल.

तक्रारींची दखल

सोलापूर, धाराशिव, बीड, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि नाशिक यांसारख्या अनेक जिल्ह्यांतून प्रवाशांच्या तक्रारी येत होत्या. साध्या बसमधील प्रवाशांना प्रीमियम किंवा एसी बसमध्ये प्रवेश नाकारला जात होता किंवा त्यांच्याकडे 100 ते 130 रुपयांची जादा मागणी केली जात होती. अनेक कामगार, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागत होता. ही बाब गंभीरतेने घेत प्रशासनाने आता कडक पावले उचलली आहेत.

वाढता ताण आणि जुन्या गाड्या

एसटीच्या ताफ्यातील अनेक गाड्यांनी त्यांचे आयुर्मान ओलांडले आहे, ज्यामुळे ग्रामीण भागात बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळालेल्या सवलतीमुळे प्रवाशांची संख्याही वाढली आहे. अशा स्थितीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. विशेषतः पुणे-सोलापूर आणि मुंबई-कोल्हापूर यांसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गावरील विनावाहक एसी बसमध्येही प्रवाशांना जागा उपलब्ध असल्यास सामावून घेणे आता अनिवार्य असेल.

तक्रार कुठे करायची?

जर कोणत्याही कर्मचाऱ्याने तुम्हाला बसमध्ये घेण्यास नकार दिला किंवा जादा पैसे मागितले, तर तुम्ही संबंधित आगार व्यवस्थापक, वाहतूक निरीक्षक किंवा विभाग नियंत्रकांकडे तक्रार करू शकता. प्रवाशांचा प्रवास विनाअडथळा व्हावा यासाठी महामंडळ कटिबद्ध असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या