Municipal Election : पालिका निवडणुकीच्या निकालांसंदर्भात नवीन परिस्थिती उद्भवली असून, मतमोजणी प्रक्रिया अपेक्षेपेक्षा हळूहळू आणि जटिल स्वरूपाची ठरत आहे. पालिका निवडणुकीची मतमोजणी आता एकावेळी एकाच वॉर्डची होणार असल्यामुळे निवडणुकीच्या निकालांमध्ये विलंब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे दुपारी अपेक्षित असलेले निकालांचे प्राथमिक चित्र मध्यरात्र पर्यंतदेखील समोर येऊ शकते, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पालिका प्रशासनादेखील या प्रक्रियेबाबत संभ्रमात असून, मतमोजणीची निश्चित पद्धत आणि नियमानुसार मार्गदर्शक सूचना मिळाल्या नाहीत, त्यामुळे कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी पालिकेकडून राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवून, मतमोजणीची स्पष्ट आणि तंतोतंत पद्धत सांगावी अशी मागणी केली आहे.
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत असून, दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. मुंबईतर्फे २२७ प्रभागांसाठी २३ विभाग निवडणूक कार्यालये तैनात करण्यात आली आहेत, ज्यामध्ये प्रत्येक कार्यालयाखाली आठ ते दहा प्रभागांच्या मतमोजणीची जबाबदारी असेल. तथापि, ईव्हीएमच्या मतमोजणीपूर्वी सुमारे ५०० टपाल मतांची मोजणी करणे आवश्यक असल्यामुळे त्यासाठी अर्धा ते एक तास लागेल, तर एका प्रभागातील सुमारे सात हजार मतांची मोजणी पूर्ण करण्यासाठी किमान दीड ते दोन तासांचा कालावधी आवश्यक आहे. यामुळे एका मतदान केंद्रावरील निकाल जाहीर होण्यास दोन ते तीन तासांचा वेळ लागेल, आणि शेवटच्या प्रभागाचा निकाल मिळेपर्यंत मध्यरात्र होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेना उमेदवार सचिन पडवळ यांनी याबाबत चिंता व्यक्त करत सांगितले की, एका वेळी केवळ एका प्रभागाची मतमोजणी करण्याच्या नियोजनामुळे निवडणुकीचे निकाल रखडणार आहेत. त्यामुळे पालिकेने यासाठी योग्य मार्ग शोधावा. पडवळ म्हणाले की, निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी पूर्वीप्रमाणेच सर्व प्रभागांमध्ये एकाच वेळी मतमोजणी सुरू करणे अधिक परिणामकारक ठरेल.
पालिका सध्याच्या नियोजनानुसार मतमोजणी प्रत्येक प्रभागानुसार अनुक्रमाने पार पडणार असली तर,मात्र; निकाल जाहीर होणाऱ्या दिवशी सकाळपासूनच सर्व प्रभागांतील उमेदवारांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मतमोजणी केंद्रावर जमा होणार. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांमध्ये उत्साहातून होणारा जल्लोष, मतमोजणीवर येणारे आक्षेप तसेच नेहमीच घडणारी वादविवादाची परिस्थिती ही गर्दी वाढवू शकते.आणि या सगळ्यामुळे मतमोजणी केंद्रांवर ताण वाढण्याची शक्यता आहे, कारण
विशेषत: या घटनेत केंद्रांवर मोठ्या प्रमाणात उपस्थिती आणि नियंत्रण न ठेवणे यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या समस्या निर्माण होण्याचा धोका आहे. पालिकेने गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष पावले उचलणे गरजेचे असून, सुरक्षा यंत्रणा, पोलिसांची तैनाती आणि कार्यकर्त्यांच्या प्रवाहाचे नियोजन यावर विशेष भर देणे आवश्यक आहे. तसेच मतमोजणी केंद्रांवर पारदर्शकता राखण्यासाठी उमेदवारांचे प्रतिनिधी व्यवस्थितपणे नियंत्रित ठेवणे आणि निकालाच्या जाहीर झाल्यानंतर शांतता सुनिश्चित करण्याचे उपाय योजणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ जानेवारी रोजी मतमोजणीसाठी हजारो कर्मचारी इलेक्शन ड्यूटीवर कार्यरत राहणार आहेत. या कर्मचाऱ्यांना या प्रक्रियेसाठी मागील अनेक दिवसांपासून प्रशिक्षण देण्यात येत आहे.
मतमोजणी प्रक्रियेत कोणताही विलंब किंवा रखडणारा वेळ उद्भवल्यास, या कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. अखेरच्या दोन दिवसांमध्ये मतमोजणी अपेक्षेपेक्षा हळूहळू झाल्यास, कर्मचार्यांचे शारीरिक आणि मानसिक ताण वाढू शकतो, तसेच वेळेवर निकाल जाहीर करण्याच्या उद्देशावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, मतमोजणी केंद्रांवरील वेळापत्रकाचे काटेकोर पालन करणे, आवश्यक साधने आणि मदत उपलब्ध करून देणे हे प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
पालिकेचे म्हणे काय?
निवडणुकीच्या मतमोजणीसाठी २३ विभाग कार्यालयांमध्ये सुमारे २८ टेबल लावण्यात येणारआहेत. या ठिकाणी एका प्रभागाची मोजणी सुरू झाली तरी सर्व टेबलवर ही मोजणी झाल्याने अर्ध्या ते एका तासात निकाल लागेल.
हे देखील वाचा – 55 inch Smart TV Offers : मोठी स्क्रीन, कमी किंमत! फ्लिपकार्टवर 55 इंच स्मार्ट टीव्हीवर मिळतोय निम्म्या किंमतीत









