भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या बिलावल भुट्टोंचा आवाज बंद

न्यूयॉर्क – पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी संयुक्त राष्ट्रांच्या पत्रकार परिषदेत भारताविरोधात द्वेषपूर्ण वक्तव्ये करत पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. मात्र त्यांच्या खोट्या आरोपांना एका परदेशी मुस्लीम पत्रकारानेच आव्हान दिले आणि भुट्टो यांची बोलती बंद केली.
भुट्टो यांनी दावा केला की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात मुस्लिमांवर संशय घेतला जातो आणि त्यांना दहशतवादी ठरवले जाते. त्यांनी भारताची तुलना इस्रायलशी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिन्यामिन नेतान्याहूसारखे वागत असल्याचा आरोप केला.
मात्र यावर त्वरित प्रतिक्रिया देत एका परदेशी मुस्लीम पत्रकाराने त्यांना खडसावले. भारतात नुकत्याच पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूरसारख्या कारवाईत एका मुस्लीम महिला अधिकाऱ्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? असा सवाल पत्रकाराने केला. या प्रश्नावर भुट्टो काहीच न बोलता फक्त मान डोलावत राहिले.भुट्टोंच्या या वक्तव्यांवरून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताविरोधात अपप्रचार करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न पुन्हा एकदा उघड झाला आहे.