Ahmedabad Plane Crash | अहमदाबादच्या मेघाणी नगर परिसरात एअर इंडियाचे (Air India) लंडनला जाणारे विमान कोसळून भीषण अपघात झाला आहे. या घटनेत (Plane Crash) 200 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून, सध्या बचावकार्य गाने सुरू आहे.
या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आता भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह आणि नागरिक उड्डाण मंत्री नायडू यांच्या राजीनाम्याचीमागणी केली आहे.
स्वामी यांनी ‘एक्स’ (X) वर पोस्ट करत 1950 च्या दशकातील रेल्वे अपघातानंतर लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांनी दिलेल्या राजीनाम्याचा दाखला दिला. त्यांनी लिहिले, “1950 च्या दशकात जेव्हा रेल्वे रुळावरून घसरली होती, तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता. त्याच नैतिकतेच्या आधारावर मी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि नागरिक उड्डाण मंत्री नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी करतो, जेणेकरून या अपघाताची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होऊ शकेल. मोदी आणि त्यांचे सहकारी आतापर्यंत जे काही करत आहेत, ते फक्त दिखावा आहे आणि तो थांबायला हवा.
When a train derailed in 1950s, Lal Bahadur Shashtri resigned. On the same morality I demand PM Modi, HM Amit Shah and Civil Aviation Naidu resign so that a free& fair inquiry is held. All that Modi and associates have been doing so far is galavanting which must stop must stop.
— Subramanian Swamy (@Swamy39) June 12, 2025
दरम्यान, एअर इंडियाचे हे विमान अहमदाबाद विमानतळावरूनउड्डाणानंतर काही क्षणांतच कोसळले. विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स , असे 242 जण होते. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथके (Rescue Teams) घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य अद्याप सुरू आहे.
लाल बहादूर शास्त्रींनी दिला होता राजीनामा
दरम्यान, 1956 मध्ये आंध्र प्रदेश येथील रेल्वे अपघातात 112 जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हा शास्त्रींनी रेल्वे मंत्री म्हणून राजीनामा दिला होता. मात्र, त्यावेळी पंतप्रधान पंडित नेहरूंनी त्यांचा राजीनामा स्विकारला नव्हता. तीन महिन्यांनंतर अरियालूर (Ariyalur) येथे झालेल्या दुसऱ्या रेल्वे अपघातात 114 जणांचा मृत्यू झाला. त्यावेळी शास्त्रींनी पुन्हा राजीनामा दिला