Home / देश-विदेश / India Seizes Sanctioned Tankers: भारताची मोठी कारवाई! मुंबईच्या समुद्रात अमेरिकेने निर्बंध घातलेली 3 जहाजे जप्त

India Seizes Sanctioned Tankers: भारताची मोठी कारवाई! मुंबईच्या समुद्रात अमेरिकेने निर्बंध घातलेली 3 जहाजे जप्त

India Seizes Sanctioned Tankers: भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अरबी समुद्रात एक मोठी कारवाई केली असून, अमेरिकेने निर्बंध लादलेली इराणशी संबंधित ३...

By: Team Navakal
India Seizes Sanctioned Tankers
Social + WhatsApp CTA

India Seizes Sanctioned Tankers: भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अरबी समुद्रात एक मोठी कारवाई केली असून, अमेरिकेने निर्बंध लादलेली इराणशी संबंधित ३ तेलवाहू जहाजे जप्त केली आहेत. अवैध व्यापार रोखण्यासाठी भारताने आपल्या सागरी क्षेत्रात पाळत ठेवली असताना ही जहाजे सापडली. रिपोर्टनुसार, जप्त करण्यात आलेली जहाजे संशयास्पद हालचाली करत होती आणि आपली ओळख लपवण्यासाठी वारंवार नाव बदलत होती.

मुंबईच्या समुद्रकिनारी थरार

मुंबईपासून सुमारे 100 नॉटिकल मैल पश्चिमेला संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर भारतीय प्राधिकरणाने ही कारवाई केली. ‘स्टेलर रुबी’, ‘अस्फाल्ट स्टार’ आणि ‘अल जाफझिया’ अशी या तीन जहाजांची नावे आहेत. ही जहाजे समुद्रात एका जहाजातून दुसऱ्या जहाजात तेल हस्तांतरित करून मूळ ठिकाण लपवण्याचा प्रयत्न करत होती. अशी प्रक्रिया सहसा आंतरराष्ट्रीय निर्बंधांमधून वाचण्यासाठी केली जाते. ही तिन्ही जहाजे आता पुढील तपासासाठी मुंबई बंदरात आणण्यात आली आहेत.

सुरक्षेत मोठी वाढ

या जहाजांच्या जप्तीनंतर भारतीय तटरक्षक दलाने सागरी सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. सध्या भारताच्या सागरी क्षेत्रात सुमारे 55 जहाजे आणि 10 ते 12 विमाने २४ तास गस्त घालत आहेत. बेकायदेशीर तेल व्यापारासाठी भारतीय जलक्षेत्राचा वापर होऊ नये, यासाठी भारत सरकार आता अत्यंत कडक पावले उचलत आहे.

आंतरराष्ट्रीय संबंधांवर परिणाम

ही कारवाई अशा वेळी झाली आहे जेव्हा भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध सुधारत आहेत. नुकतेच अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क 50 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली होती. दुसरीकडे, इराणच्या नॅशनल इराण ऑइल कंपनीने या जहाजांशी किंवा त्यातील मालाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. मात्र, शिपिंग डेटा नुसार, यातील दोन जहाजे थेट इराणशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.

अवैध तेल आणि इंधनाचा व्यापार मोठ्या सवलतीत केला जातो, कारण त्यात अनेक धोके असतात. मध्यस्थ अनेकदा मालकी हक्काची खोटी कागदपत्रे आणि समुद्राच्या मधोमध माल बदलून तपास यंत्रणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, भारताच्या या कारवाईमुळे अशा छुप्या व्यापाराला मोठा चाप बसला आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या