Home / देश-विदेश / IndiGo CEO Resigns: इंडिगोमध्ये मोठी उलथापालथ! मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एलबर्स यांचा राजीनामा; विमानांच्या खोळंब्याचा बसला फटका

IndiGo CEO Resigns: इंडिगोमध्ये मोठी उलथापालथ! मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एलबर्स यांचा राजीनामा; विमानांच्या खोळंब्याचा बसला फटका

IndiGo CEO Resigns: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एलबर्स...

By: Team Navakal
IndiGo CEO Resigns
Social + WhatsApp CTA

IndiGo CEO Resigns: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एलबर्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, तो तातडीने मंजूर करण्यात आला आहे. एलबर्स यांच्या जाण्यानंतर आता कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राहुल भाटिया यांच्याकडे हंगामी पदभार सोपवण्यात आला आहे.

कारवाई आणि दंडाचा बसला फटका

पीटर एलबर्स यांचा हा राजीनामा विमान कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या ऑपरेशनल संकटानंतर आला आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात इंडिगोच्या विमानांचा मोठा खोळंबा झाला होता, ज्यामध्ये सुमारे ३ लाख प्रवासी अडकून पडले होते. या प्रकरणी विमान वाहतूक नियामक डीजीसीएने इंडिगोला २२.२० कोटी रुपयांचा मोठा दंड ठोठावला होता. या संकटामुळे कंपनीला जवळपास २,००० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान सोसावे लागल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

चौकशी समितीचा गंभीर ठपका

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सूचनेनुसार नेमलेल्या चार सदस्यीय चौकशी समितीने इंडिगोच्या कार्यपद्धतीवर ओढलेले ताशेरे एलबर्स यांच्या राजीनाम्यास कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे. समितीने आपल्या अहवालात खालील त्रुटींवर बोट ठेवले होते:

  1. व्यवस्थापकीय निष्काळजीपणा: कंपनीच्या व्यवस्थापनात मोठे दोष आढळले.
  2. सॉफ्टवेअरमधील उणिवा: कंपनीची सॉफ्टवेअर प्रणाली कमकुवत असल्याचे समोर आले.
  3. कर्मचाऱ्यांचे नियोजन: कर्मचाऱ्यांच्या ड्युटीचे वेळापत्रक आखताना सुरक्षेपेक्षा वापरावर अधिक भर दिला गेला, ज्यामुळे संकट काळात सावरण्यास वेळ मिळाला नाही.
  4. बफर स्टॉकची कमतरता: विमानांच्या उड्डाणासाठी आवश्यक असलेला आपत्कालीन साठा आणि राखीव कर्मचारी संख्या अपुरी होती.

एलबर्स यांचा निरोप

सप्टेंबर २०२२ मध्ये इंडिगोची धुरा सांभाळणाऱ्या पीटर एलबर्स यांनी आपल्या राजीनाम्याचे कारण वैयक्तिक असल्याचे सांगितले आहे. राहुल भाटिया यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी इंडिगो कुटुंबाचा भाग असणे हा सन्मान असल्याचे नमूद केले. याआधी हैदराबाद येथील एका कार्यक्रमात त्यांनी प्रवाशांच्या झालेल्या त्रासाबद्दल माफीही मागितली होती, परंतु ३ दिवसांच्या संकटामुळे कंपनीच्या २० वर्षांच्या वारशाला डाग लागू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

इंडिगो आता अंतर्गत प्रक्रियेत सुधारणा करून भविष्यातील संकटांना तोंड देण्यासाठी सज्ज होत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या