मेघालय हनीमून हत्याकांड: राज कुशवाहाच निघाला संजय वर्मा, सोनमने लग्नावेळी 100 फोन कोणाला केले होते? समोर आली माहिती

Meghalaya Honeymoon Murder Case

Meghalaya Honeymoon Murder Case | लग्नानंतर हनिमूनला गेलेल्या इंदूरच्या राजा रघुवंशीची त्याच्यात पत्नीने निर्घूण हत्या केल्याने देशभरात खळबळ उडाली होते. मेघालयातील हनीमूनदरम्यान झालेल्या या हत्येत राजा यांची पत्नी सोनम रघुवंशी मुख्य संशयित असून, तिचे राज कुशवाह याच्यासोबतचे प्रेमसंबंध हत्येचे कारण असल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणात संजय वर्मा हे देखील नाव सातत्याने समोर येत होते. सोनमने लग्नाच्या वेळी संजयला 100 पेक्षा अधिक फोन केल्याची माहिती समोर आळी होती. त्यानंतर पोलिसांनी संजय वर्माचा तपास सुरू केला होता. अखेर राज कुशवाहच संजय वर्मा असल्याची माहिती समोर आली आहे.

संजय वर्मा कोण? कॉल रेकॉर्ड्समधून खुलासे

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, “सोनमने राजाशी लग्नापूर्वी संजय वर्माला 100 हून अधिक फोन कॉल्स केले होते. लग्नानंतरही हे कॉल्स सुरू होते.” तपासात असे समोर आले की, संजय वर्मा हा सोनमचा प्रियकर राज कुशवाह आहे. 23 मे रोजी सोनमच्या उपस्थितीत कुशवाहने तीन मारेकऱ्यांना हत्येसाठी पाठवले होते, असा पोलिसांचा दावा आहे.

हत्येचा घटनाक्रम: मेघालयातील हनीमून आणि सोनमचे पलायन

राजा आणि सोनम रघुवंशी यांचे मोठ्या थाटामाटात लग्न झाल्यानंतर अवघ्या 9 दिवसांनी ते मेघालयातील सोहरा येथे हनीमूनसाठी गेले होते. 23 मे 2025 रोजी शिलाँगपासून 65 किलोमीटर अंतरावरील सोहराच्या शांत टेकड्यांमध्ये दोघेही बेपत्ता झाले. 2 जून रोजी राजा यांचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला, तर सोनमने हत्येनंतर मेघालयातून पलायन केल्याचे उघड झाले. ती आसाम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशातून प्रवास करत इंदूरला पोहोचली. तपासात महत्त्वाची लीड म्हणून सोनमने होमस्टेमध्ये सोडलेले मंगळसूत्र आणि अंगठी मिळाली.

सोनम आणि कुशवाह यांचे संबंध राजाशी लग्नापूर्वीपासून होते, असे तपासातून स्पष्ट झाले आहे. यामुळे हत्येचा कट रचला गेला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.

सोनमचा भाऊ गोविंद याने संजय वर्माशी कोणताही संबंध असल्याचे नाकारले आहे. “मला संजय वर्माबद्दल काहीच माहिती नाही. मी फक्त राजा जिथे काम करत होता, ती ठिकाणे दाखवण्यासाठी आलो होतो. संजयचे नाव यात आहे, हे मला आजच कळले.” , असे त्यांनी सांगितले.