Sam Pitroda Controversy: इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा हे आपल्या वक्तव्यामुळे पुन्हा वादात सापडले आहे. “पाकिस्तानात मला घरी असल्यासारखे वाटले,”, असे वक्तव्य त्यांनी एका मुलाखतीत केले होते. या विधानावर आता त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
सॅम पित्रोदा यांनी पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळच्या भेटीदरम्यान ‘घरी असल्यासारखं वाटलं’ या आपल्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. ‘त्याचा उद्देश सामायिक इतिहास आणि लोकांमध्ये बंधुभाव वाढवणे’ हा होता, असे त्यांनी म्हटले आहे.
‘दहशतवाद आणि संघर्षाकडे दुर्लक्ष करण्याचा उद्देश नव्हता’
‘X’ (ट्विटर) वर एक निवेदन पोस्ट करून पित्रोदा म्हणाले, “जेव्हा मी म्हणालो की मला शेजारच्या देशांना भेट देताना अनेकदा ‘घरी असल्यासारखं वाटलं’, किंवा सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या आपली मुळे समान आहेत, तेव्हा माझा उद्देश दहशतवाद आणि भू-राजकीय तणावामुळे होणाऱ्या वेदना किंवा गंभीर आव्हानांकडे दुर्लक्ष करण्याचा नव्हता.”
ते पुढे म्हणाले की, त्यांचा उद्देश ‘सकारात्मक संवाद, सहानुभूती आणि अधिक जबाबदार दृष्टीकोन’ वाढवणे हा होता. जर माझ्या शब्दांमुळे कोणताही संभ्रम किंवा दुःख झाले असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.
काय म्हणाले होते सॅम पित्रोदा?
एका मुलाखतीत बोलताना त्यांनी पाकिस्तानात मला घरच्यासारखे वाटले, असे वक्तव्य केले होते ‘भारताच्या परराष्ट्र धोरणात शेजारी देशांना सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवे. आपण आपल्या शेजारी देशांसोबत चांगले संबंध निर्माण करू शकतो का, हा प्रश्न आहे. मी पाकिस्तानमध्ये जाऊन आलो आहे. तेथे मला घरच्यासारखे वाटले. मी बाहेरच्या देशात आहे, असे मला वाटलेच नाही. बांगलादेश व नेपाळमध्येही मला हाच अनुभव आला,’ असे ते म्हणाले होते.
वादग्रस्त विधानांचा जुना इतिहास
सॅम पित्रोदा यांनी यापूर्वीही वारंवार वादग्रस्त विधाने केली आहेत, ज्यात वारसा कर आणि भारतीयांबद्दलच्या वांशिक टिप्पणींचा समावेश आहे. त्यांचे हे ताजे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध अजूनही तणावपूर्ण आहेत.
‘विश्र्वगुरू’ या संकल्पनेवरही त्यांनी भाष्य केले. परराष्ट्र धोरण ‘प्रत्यक्ष प्रभाव, परस्पर विश्वास, शांतता आणि प्रादेशिक स्थैर्य’ यावर आधारित असावे, केवळ दिखाऊपणावर नाही, असा सल्ला त्यांनी दिला.
हे देखील वाचा – ‘ऑपरेशन सिंदूर’ 4 दिवसांत का थांबवले? हवाई दल प्रमुख ए.पी. सिंग यांनी सांगितले मोठे कारण
Sam Pitroda : ‘पाकिस्तानमध्ये घरी असल्यासारखं वाटलं…’, सॅम पित्रोदांच्या वक्तव्याने वाद; टीका होताच दिले स्पष्टीकरण
Sam Pitroda Controversy: इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा हे आपल्या वक्तव्यामुळे पुन्हा वादात सापडले आहे. “पाकिस्तानात मला घरी असल्यासारखे...
Sam Pitroda Controversy: इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा हे आपल्या वक्तव्यामुळे पुन्हा वादात सापडले आहे. “पाकिस्तानात मला घरी असल्यासारखे वाटले,”, असे वक्तव्य त्यांनी एका मुलाखतीत केले होते. या विधानावर आता त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
सॅम पित्रोदा यांनी पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळच्या भेटीदरम्यान ‘घरी असल्यासारखं वाटलं’ या आपल्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. ‘त्याचा उद्देश सामायिक इतिहास आणि लोकांमध्ये बंधुभाव वाढवणे’ हा होता, असे त्यांनी म्हटले आहे.
‘दहशतवाद आणि संघर्षाकडे दुर्लक्ष करण्याचा उद्देश नव्हता’
‘X’ (ट्विटर) वर एक निवेदन पोस्ट करून पित्रोदा म्हणाले, “जेव्हा मी म्हणालो की मला शेजारच्या देशांना भेट देताना अनेकदा ‘घरी असल्यासारखं वाटलं’, किंवा सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या आपली मुळे समान आहेत, तेव्हा माझा उद्देश दहशतवाद आणि भू-राजकीय तणावामुळे होणाऱ्या वेदना किंवा गंभीर आव्हानांकडे दुर्लक्ष करण्याचा नव्हता.”
ते पुढे म्हणाले की, त्यांचा उद्देश ‘सकारात्मक संवाद, सहानुभूती आणि अधिक जबाबदार दृष्टीकोन’ वाढवणे हा होता. जर माझ्या शब्दांमुळे कोणताही संभ्रम किंवा दुःख झाले असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.
काय म्हणाले होते सॅम पित्रोदा?
एका मुलाखतीत बोलताना त्यांनी पाकिस्तानात मला घरच्यासारखे वाटले, असे वक्तव्य केले होते ‘भारताच्या परराष्ट्र धोरणात शेजारी देशांना सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवे. आपण आपल्या शेजारी देशांसोबत चांगले संबंध निर्माण करू शकतो का, हा प्रश्न आहे. मी पाकिस्तानमध्ये जाऊन आलो आहे. तेथे मला घरच्यासारखे वाटले. मी बाहेरच्या देशात आहे, असे मला वाटलेच नाही. बांगलादेश व नेपाळमध्येही मला हाच अनुभव आला,’ असे ते म्हणाले होते.
वादग्रस्त विधानांचा जुना इतिहास
सॅम पित्रोदा यांनी यापूर्वीही वारंवार वादग्रस्त विधाने केली आहेत, ज्यात वारसा कर आणि भारतीयांबद्दलच्या वांशिक टिप्पणींचा समावेश आहे. त्यांचे हे ताजे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध अजूनही तणावपूर्ण आहेत.
‘विश्र्वगुरू’ या संकल्पनेवरही त्यांनी भाष्य केले. परराष्ट्र धोरण ‘प्रत्यक्ष प्रभाव, परस्पर विश्वास, शांतता आणि प्रादेशिक स्थैर्य’ यावर आधारित असावे, केवळ दिखाऊपणावर नाही, असा सल्ला त्यांनी दिला.
हे देखील वाचा – ‘ऑपरेशन सिंदूर’ 4 दिवसांत का थांबवले? हवाई दल प्रमुख ए.पी. सिंग यांनी सांगितले मोठे कारण
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी पोर्टल पुन्हा कार्यान्वित, ३१ मार्चपर्यंत मुदत
Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महानगरपालिकेवर प्रथमच महायुतीचा भगवा; रूपाराणी निकम महापौर तर अक्षय जरग उपमहापौरपदी विराजमान
Nashik Mayor Election 2026 : एकमेकांविरोधात दंड थोपटणारे भाजप-शिंदे गट सत्तेत एकत्र; हिमगौरी आडके महापौर तर विलास शिंदे उपमहापौरपदी विराजमान
Rajya Sabha Election : राज्यसभेतील ७ जागा होणार रिक्त, खासदारकीसाठी शरद पवारांना लागणार अजित पवार गटाचा प्रबळ पाठिंबा?
Share:
Must Read
‘चीनला शत्रू मानण्याचा विचार थांबवावा लागेल’, सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झाला वाद
NTPC मध्ये नोकरीची संधी, 400 पदांसाठी भरती जाहीर, पाहा संपूर्ण माहिती
इलॉन मस्क यांच्या ‘टेस्ला’मध्ये काम करायचं आहे? कंपनीने भारतात सुरू केली भरती
कर्मचाऱ्यांनी किती तास काम करावे? आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केले मत
गिग कामगार म्हणजे नक्की कोण? त्यांच्यासाठी सरकारने बजेटमध्ये कोणत्या घोषणा केल्या आहेत?
जिओने लाँच केला 445 रुपयांचा शानदार रिचार्ज प्लॅन, डेटा-कॉलिंगसह 13 ओटीटी अॅपचे सबस्क्रिप्शन मोफत