Suryakumar Yadav on PM Modi Post: आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पाच गडी राखून पराभूत केल्यानंतर आता या विजयावर राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत. पंतप्रधान मोदींनी देखील यावर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधानांनी भारताच्या या विजयाची तुलना ‘ऑपरेशन सिंदूर’ शी केली होती. आता टीम इंडियाचा (Team India) कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या प्रतिक्रियेचे कौतुक केले आहे.’देशाचा नेता फ्रंट फूटवर बॅटिंग करत आहे,’ अशा शब्दांत सूर्यकुमारने आनंद व्यक्त केला.
पंतप्रधानांचे कौतुक आणि सूर्यकुमारची प्रतिक्रिया
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला नमवून आशिया कप जिंकला. पंतप्रधान मोदींनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत टीम इंडियाच्या विजयाचे कौतुक केले. त्यांनी लिहिले, “खेळाच्या मैदानावरील #OperationSindoor. निकाल तोच आहे – भारत जिंकतो! आपल्या क्रिकेटपटूंचे अभिनंदन.”
या पोस्टवर प्रतिक्रिया देताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, “जेव्हा देशाचा नेता स्वतः फ्रंट फूटवर बॅटिंग करतो, तेव्हा खूप छान वाटते. त्यांनी स्वतः स्ट्राइक घेऊन धावा केल्याचा अनुभव आला. हे पाहून खूप आनंद झाला आणि जेव्हा सर पुढे उभे असतात, तेव्हा खेळाडू नक्कीच मुक्तपणे खेळतात.”
ट्रॉफी नाकारण्यामागचे कारण आणि देणगीचा निर्णय
या स्पर्धेदरम्यान टीम इंडियाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी पारंपरिक हस्तांदोलनकरण्याचे टाळले होते. तसेच, अंतिम सामन्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्याकडून आशिया कपची ट्रॉफी स्वीकारली नाही.
मोहसीन नक्वी, जे पाकिस्तानचे गृहमंत्री देखील आहेत, त्यांनी यापूर्वी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि चार दिवसांच्या संघर्षाचा संदर्भ देत भारताविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यांच्या या वर्तनामुळे भारतीय खेळाडू नाराज झाले, ज्यामुळे त्यांनी नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेणे नाकारले.
दरम्यान, या विजयाच्या निमित्ताने सूर्यकुमार यादवने एक मोठी घोषणा केली आहे. त्याने या स्पर्धेतून मिळालेले आपले मानधन भारतीय सशस्त्र दल आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील (Pahalgam Terror Attack) पीडितांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी देणार असल्याचे जाहीर केले आहे.
हे देखील वाचा – कॅनडा सरकारचा मोठा निर्णय! लॉरेन्स बिश्नोई टोळीला ‘दहशतवादी संघटना’ म्हणून केलं घोषित