Home / लेख / Namo Shetkari Yojana: कधीपर्यंत जमा होणार ‘नमो शेतकरी’ योजनेचा ८ वा हप्ता? जाणून घ्या

Namo Shetkari Yojana: कधीपर्यंत जमा होणार ‘नमो शेतकरी’ योजनेचा ८ वा हप्ता? जाणून घ्या

Namo Shetkari Yojana : महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या ८ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत....

By: Team Navakal
Namo Shetkari Yojana
Social + WhatsApp CTA

Namo Shetkari Yojana : महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या ८ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान’ योजनेचा २१ वा हप्ता महिनाभरापूर्वीच वितरित झाल्याने आता राज्य सरकारच्या निधीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या हप्त्याच्या वितरणापूर्वी एक महत्त्वाची माहिती समोर आली असून, पात्र लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट होण्याची चिन्हे आहेत.

आचारसंहितेचा अडथळा आणि वितरणाची वेळ

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या आचारसंहिता लागू आहे. याच तांत्रिक कारणास्तव सरकारने अद्याप हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेली नाही. ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना हप्त्याचे वितरण केले जाऊ शकते.

मात्र, अद्याप शासनाकडून हप्ता जमा करण्याची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

लाखो शेतकरी का होणार वंचित?

यंदाच्या हप्त्यासाठी कृषी विभागाने निकषांची अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी सुरू असलेल्या तपासणीमुळे लाभार्थ्यांच्या आकड्यात मोठी घट झाली आहे. पीएम किसानच्या मागील हप्त्यावेळी लाभार्थ्यांची संख्या ९६ लाखांवरून ९२ लाखांपर्यंत खाली आली होती. हाच कल आता राज्य सरकारच्या योजनेतही दिसून येत असून, जवळपास ४ ते ५ लाख शेतकऱ्यांना या लाभापासून मुकावे लागण्याची शक्यता आहे.

या कारणांमुळे नावे वगळली जाणार

योजनेतून नाव बाद होण्यामागे काही प्रमुख प्रशासकीय आणि तांत्रिक कारणे आहेत:

  1. मृत लाभार्थी: तपासणी दरम्यान सुमारे 28,000 मृत लाभार्थ्यांची नावे यादीतून काढण्यात आली आहेत.
  2. दुहेरी लाभ: एकाच जमिनीवर दोनदा लाभ घेणारे सुमारे 35,000 लाभार्थी अपात्र ठरवण्यात आले आहेत.
  3. रेशन कार्ड नियम: नवीन नियमानुसार कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
  4. आयकर आणि सेवा क्षेत्र: जे शेतकरी आयकर भरतात किंवा सरकारी सेवा क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

प्रशासनाकडून होत असलेल्या या कडक तपासणीमुळे केवळ गरजू आणि पात्र शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळेल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या