मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जळगाव दौऱ्यात ! काळे झेंडे, आत्मदहन आंदोलन

Chaos During CM Devendra Fadnavis' Jalgaon Visit

जळगाव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव (Jalgaon) दौऱ्यात आज विविध कार्यक्रमांचे उद्घाटन (Inaugurations) व भूमिपूजन (foundation)पार पडले. तर दुसरीकडे त्यांच्या ताफ्यासमोर आंदोलन, विरोध आणि आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे गोंधळ निर्माण झाला.

मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक, हिंदू गोर बंजारा आणि लबाना समाज कुंभ प्रेरणा स्थळाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांची उपस्थिती लक्षवेधक ठरली. त्यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. त्यानंतर धरणगाव (Dharangaon)जवळील २ हेक्टर क्षेत्रावर उभारल्या जाणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजनही फडणवीसांच्या हस्ते झाले. दरम्यान, पिंपरी येथे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचे येताच शरद पवार गटाने (Sharad Pawar group) काळे झेंडे दाखवले. शरद पवार गटाच्या नेत्या कल्पिता पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आले. घोषणाबाजीमुळे काही काळ तिथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी सर्व आंदोलकांना (protestors)ताब्यात घेतले. तर जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात (Akashvani Chowk) मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये घुसून संजय वराडे या ठेकेदाराने आत्मदहनाचा प्रयत्न केला. शासनाकडे येणे असलेले पैसे मिळत नसल्याने वराडे यांनी हे पाऊल उचलेले. पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. नंतर पोलिसांनी (Police)वराडे यांना ताब्यात घेतले.

स्मारकाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, क्रांतिकारी क्रांतिवीर स्वातंत्र्यसेनानी शेख ख्वाजाजी नाईक यांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी आपण सगळे एकत्र आलो आहोत. फेब्रुवारी २०१९ मध्ये याच ठिकाणी या स्मारकाचे मी भूमिपूजन केले होते. कधी कधी एखादे चांगले काम हे तुमच्या नशिबी लिहिलेले असते. कदाचित उद्घाटनासाठी मी मुख्यमंत्री व्हायचीच वाट पाहत होते. भारतीय हिंदू समाजात आणि आदिवासी समाजात फूट पाडण्याचे काम जे करत आहेत, त्यांना कुठेतरी उत्तर देण्याची आवश्यकता आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींनी ८० हजार कोटी रुपये दिलेले आहेत. येत्या पाच वर्षांमध्ये आदिवासी कुटुंबाकडे घर, वीज, पाणी, गॅस, शिक्षण, रोजगार पोहोचला आहे. त्यामुळे पूर्णपणे आदिवासी समाजाचे जीवन बदलेल.