Home / महाराष्ट्र / Baramati Election: “2029 मध्ये बारामतीत काँग्रेसचाच झेंडा फडकणार”; अर्ज माघारीनंतर हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Baramati Election: “2029 मध्ये बारामतीत काँग्रेसचाच झेंडा फडकणार”; अर्ज माघारीनंतर हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Harshwardhan Sapkal on Baramati Election: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकताच बारामतीचा दौरा केला. यावेळी त्यांनी केवळ आगामी निवडणुकांबाबतच भाष्य...

By: Team Navakal
Baramati Election
Social + WhatsApp CTA

Harshwardhan Sapkal on Baramati Election: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकताच बारामतीचा दौरा केला. यावेळी त्यांनी केवळ आगामी निवडणुकांबाबतच भाष्य केले नाही, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून सरकारवर जोरदार टीका केली. बारामती विधानसभेचा अर्ज मागे घेण्यामागे कोणतीही राजकीय खेळी नसून केवळ आलेल्या विनंतीचा मान राखून घेतलेला हा निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

२०२९ ची तयारी आतापासूनच!

सपकाळ यांनी ठामपणे सांगितले की, “आम्ही आता बारामतीत संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे. जरी आता अर्ज मागे घेतला असला, तरी २०२९ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आपला स्वतंत्र उमेदवार उभा करेल आणि तो निवडूनही येईल.” बारामतीला पुन्हा ‘काँग्रेसमय’ करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अर्ज माघारीचे पडद्यामागचे नाट्य

अर्ज मागे घेण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक नेत्यांचे फोन आले होते, तसेच आमदार रोहित पवार यांनीही प्रत्यक्ष भेट घेतली होती, अशी माहिती सपकाळ यांनी दिली. मात्र, राष्ट्रवादीच्या दिल्लीत वजन असलेल्या नेत्यांनी साधी विचारणाही केली नाही, असा टोला त्यांनी सुनील तटकरे यांचे नाव न घेता लगावला. बारामतीकरांनी आपल्या विवेकबुद्धीने मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी का नाही?

रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवर सविस्तर चर्चा झाली. यावर सपकाळ म्हणाले:

  • कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांच्या हस्तक्षेपामुळे या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
  • महाराष्ट्रात मात्र ‘झीरो नंबर’ने एफआयआर येऊनही शासन चौकशी करण्यास टाळाटाळ करत आहे.
  • या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याशीही चर्चा झाली असून काँग्रेस या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहे.

भाजपवर ‘चेटकीण’ शब्दांत टीका

भाजपवर निशाणा साधताना सपकाळ यांची जीभ घसरली. त्यांनी भाजपला ‘खोकला’ आणि ‘नीतिमत्ता नसलेला’ पक्ष म्हटले. “भाजपला चेटकिणीसारखा आजार झाला आहे, जी स्वतःचीच मुले खाते. हे पक्षही इतर पक्षांतील नेत्यांना संपवण्याचे काम करत आहेत,” अशी विखारी टीका त्यांनी केली. अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्याच्या अपघाताची साधी चौकशी होत नाही, हाच त्यांचा ‘डाउनफॉल’ असल्याचेही ते म्हणाले.

Web Title:
संबंधित बातम्या