JJ Hospital Shootout : आजवर महाराष्ट्रात अनेक गोष्टी घडल्या अनेक वार पलटवार झाले. आणि काही दिवस महाराष्ट्रातील माणसांच्या मना-मनावर कोरून राहिले त्यातीलच एक अगदी खोलवर रुजलेलं हत्याकांड. ते म्हणजे जे-जे हत्याकांड. महाराष्ट्राला मिळालेला धक्का. हि गोष्ट जवळ जवळ १९९२ सालची इतकी जुनी गोष्ट पण या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला होता. पण इतक्या वर्षांनी हि घटना परत का? मागे सोडून आलेल्या गोष्टींचं आता काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घ्या.
जवळ जवळ ३२ वर्ष मागे मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर रुग्णांच्या तपासणीत गर्क होते, नर्सेस रुग्णसेवेत व्यस्त होत्या अगदी रोजसारखेच ते चित्र होते पण ती सकाळ भयावह होती. रुग्णालयाच्या त्या वॉर्डमध्ये अचानक गोळ्यांचा वर्षाव झाला. अवघ्या काही सेकंदात होत्याच न्हवत झालं. ३३ गोळ्या झाडल्या गेल्या आणि संपूर्ण मुंबई या हत्याकांडाने बिथरली. मागच्या काही वर्षातील पोलीस रेकॉर्डनुसार, अरुण गवळीचा विश्वासू साथीदार शैलेश हळदणकर मारेकऱ्यांचे लक्ष्य होता. आता अरुण गवळी बद्दल वेगळं सांगायलाच नको महाराष्ट्रातील घर घरात अरुण गवळी कोण हे सगळ्यांना माहिती असेल.
त्यावेळी हल्ल्याच्या काही दिवस आधीच एका चकमकीत शैलेश हळदणकर हा जखमी झाला होता आणि पोलीस बंदोबस्तात त्याला रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते. हळदणकरच्या अगदी बाजूच्याच खाटेवर गवळीचा आणखी एक साथीदार बिपीन शेरे हाही जखमी अवस्थेत दाखल होता. हळदणकरच्या जवळ दोन सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले होते. त्या सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास काहीजण ‘हळदणकरला भेटायचंय’ असं सांगून थेट वॉर्डात घुसले. आणि क्षणाचा देखील विलंब न करता त्यांनी स्वयंचलित बंदुका बाहेर काढून हळदणकर आणि त्यांच्या संरक्षणार्थ असलेल्या दोन्ही पोलिसांवर गोळीबार सुरू केला. या हल्यात हळदणकर आणि संरक्षणार्थ असलेले दोन्ही पोलीस जागीच ठार झाले. या प्रकरणाची त्यावेळेस पोलिसांनी न्यायालयात हि माहिती दिली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, ८०च्या दशकात गुन्हेगारी विश्वात मोठी उलथापालथ झाली होती. मागचा इतिहास असे सांगतो की कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि अरुण गवळी आधीच्या काळात एकत्रच काम करत होते. मात्र नंतर त्यांच्या टोळ्यांमध्ये मोठी फूट पडली. ८० च्या दशकातली हि मोठी फूट मानली जात होती. आणि त्यानंतर ही फूट वाढत दोघेही एकमेकांचे कट्टर शत्रू बनले. आणि या घर्षाची ठिणगी पडली ती, दाऊदचा मेव्हणा इब्राहिम पारकरच्या खुनामुळे. पारकरच्या हत्येमागे गवळी टोळीच असल्याची दाऊदला दाट शक्यताला होती. त्याचा बदला घेण्यासाठी हे जेजे हत्याकांड करवण्यात आलं, अशी माहिती तत्कालीन खटल्यामध्ये मुंबई पोलिसांनी न्यायालयात दिली होती. या खटल्यात या आधी काही जणांना शिक्षा देखील झाली होती. परंतु तरीही ह्या प्रकरणाने आता पुन्हा डोकं वर काढलं आहे.
मागच्या वर्षी २०२४ साली ऑक्टोबर महिन्यात या प्रकरणात त्रिभुवन रामपती सिंग ऊर्फ श्रीकांत राय उर्फ प्रधान याला उत्तर प्रदेशात अटक करण्यात आली. आणि ३२ वर्ष जुन्या प्रकरणाचं गुड पुन्हा एकदा वाढल. या प्रकरणात तब्बल ३२ वर्षांनंतर ही अटक झाली. या प्रकरणातील मूळचे तपास अधिकारी आता निवृत्त झाले आहेत. १९९० च्या सुमारास डिजिटल डेटाबेस हा प्रकारमुळी जन्माला आलाच न्हवता. त्यामुळे या प्रकरणाचा शोध लावणे तितकेसे कठीण होते. मात्र मुंबई पोलिसांनी संयमाने या प्रकरणाचा तपास करत आरोपीला अटक केली. या ३२ वर्ष जुन्या केसाला पुन्हा उभ राहताना याच्या मुळाशी काय दडलं असेल हे पाहन महत्वाचं ठरणार आहे. शिवाय या प्रकारची चौकशी कोणतं नवीन वळण घेते ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
हे देखील वाचा – Air Pollution Across India : संपूर्ण भारतात वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल









