Home / महाराष्ट्र / Kishori Pednekar On Neelam Gorhe : राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण ढवळून निघाले: नीलम गोऱ्हेंनबद्दल बोलताना किशोरी पेडणेकरणाची जीभ घसरली

Kishori Pednekar On Neelam Gorhe : राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण ढवळून निघाले: नीलम गोऱ्हेंनबद्दल बोलताना किशोरी पेडणेकरणाची जीभ घसरली

Kishori Pednekar On Neelam Gorhe : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सध्या एका नव्या वादाने तोंड वर काढले असून, विधान...

By: Team Navakal
Kishori Pednekar On Neelam Gorhe
Social + WhatsApp CTA

Kishori Pednekar On Neelam Gorhe : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सध्या एका नव्या वादाने तोंड वर काढले असून, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. देसाई यांच्या दाव्यानुसार, गोऱ्हे यांनी खरातची भेट घेतली असून, त्याच्याकडून स्वतःचे भविष्य जाणून घेण्यासाठी त्या खरातला भेटल्या होत्या. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असतानाच, नीलम गोऱ्हे यांनी तातडीने पत्रकार परिषद आयोजित करून हे सर्व आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले. मात्र, हे प्रकरण तिथेच न थांबता आता अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

या वादात आता शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उडी घेतली असून, त्यांनी तृप्ती देसाई यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. पेडणेकर यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर बोचरी टीका करताना म्हटले आहे की, ज्या सामाजिक बांधिलकीतून तृप्ती देसाई कार्य करत आहेत, त्या या प्रकरणातील ठोस पुरावे देण्यास सज्ज आहेत. “तृप्ती देसाई पुराव्यांसह बोलत असताना नीलम गोऱ्हे आता उलट इतरांकडेच प्रमाण मागू लागल्या आहेत, हे अनाकलनीय आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. पेडणेकर यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत गोऱ्हे यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांवर प्रहार केला आहे.

किशोरी पेडणेकर यांनी सोशल मीडियावरील प्रतिक्रियांचा हवाला देत गोऱ्हे यांच्यावर वैयक्तिक टीका देखील केली. “लोकांच्या कमेंट्समध्ये असे म्हटले जात आहे की, नाव ‘गोऱ्हे’ असले तरी कृत्य मात्र ‘काळे’ आहे. इतक्या कठोर आणि कलुषित हृदयाची ही स्त्री आहे,” अशा जहाल शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

“पक्षाने २४ वर्षे मानसन्मान दिला, पण योगदान शून्य”; किशोरी पेडणेकर यांची नीलम गोऱ्हे यांच्यावर घणाघाती टीका-
शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गट यांच्यातील राजकीय संघर्ष आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांच्या पातळीवर येऊन पोहोचला आहे. शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर अत्यंत तीक्ष्ण शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. पेडणेकर यांच्या मते, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांना गेल्या २४ वर्षांपासून पक्षात मोठा मानसन्मान दिला, त्यांना विधान परिषदेची आमदारकी देऊन मोठे केले. मात्र, इतकी पदे आणि प्रतिष्ठा उपभोगूनही गोऱ्हे यांनी पक्षासाठी केलेले काम ‘शून्य’ आहे, असा आरोप पेडणेकर यांनी केला आहे.

पेडणेकर यांनी पुढे बोलताना नीलम गोऱ्हे यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जिथे स्वार्थ दिसेल तिथे धावून जाणे, हेच या बाईंचे काम आहे,” अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी गोऱ्हे यांच्या पक्षांतराचा आणि सद्यस्थितीतील भूमिकेचा समाचार घेतला.

“स्वार्थासाठी धाव आणि पक्षासाठी योगदान शून्य”; किशोरी पेडणेकर यांचा नीलम गोऱ्हे यांच्यावर घणाघाती प्रहार-
“ज्या पक्षाने नीलम गोऱ्हे यांना गेल्या २४ वर्षांपासून आमदारकी दिली, मानसन्मान दिला, त्या पक्षासाठी त्यांचे योगदान शून्य आहे. स्वतःचा प्रोटोकॉल पाळणे आणि वैयक्तिक प्रतिष्ठा जपणे या पलीकडे त्यांची धाव नाही,” अशा शब्दांत पेडणेकर यांनी गोऱ्हे यांच्या कार्यपद्धतीचा निषेध केला. ‘जिथे लाभ तिथे धाव’ अशी त्यांची वृत्ती असून, त्यांनी केवळ स्वतःच्या प्रसिद्धीला महत्त्व दिल्याचे पेडणेकर यांनी नमूद केले.

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा संदर्भ देत पेडणेकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, ज्या ज्या ठिकाणी महिलांवर अन्याय झाले, तिथे आम्ही देखील धावून गेलो होतो; परंतु नीलम गोऱ्हे यांनी आमदार पदाचा वापर करून केवळ स्वतःचे नाव मोठे करण्यावर भर दिला. धुळ्यातील अत्याचाराच्या घटनेचा दाखला देत त्यांनी सांगितले की, “त्या वेळी आम्ही सर्वजण उपस्थित होतो, मात्र गोऱ्हे यांनी नेहमीच इतरांना बाजूला सारून स्वतःला महत्त्व कसे मिळेल, हेच पाहिले.

या वादात आता ‘अशोक खरात’ प्रकरणाचीही भर पडली आहे. किशोरी पेडणेकर यांच्या दाव्यानुसार, खरात प्रकरणातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. “महिलांवरील अत्याचाराच्या विषयासोबतच, मंत्रीपद कसे मिळवायचे, त्यासाठी विधी-विधान किंवा अघोरी कृत्ये कशी करायची आणि त्यातून स्वतःचा लाभ कसा करून घ्यायचा, यामध्ये अनेक मंत्र्यांचा सहभाग असल्याचे दिसत आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या