‘क्या हुआ तेरा वादा?’, म्हणत उबाठाचा छत्रपती संभाजीनगरात ट्रॅक्टर मोर्चा

UBT sambhajinagar tractor morcha

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगर येथे उबाठाच्या (UBT) वतीने Kya hua tera wada म्हणत आज ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. Mahayuti सरकारने सत्तेत येण्याआधी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौकातून विभागीय आयुक्तालय कार्यालयापर्यंत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी Tractor मोर्चात सहभाग घेतला. यावेळी स्वतः अंबादास दानवे यांनी ट्रॅक्टर चालवले. विधानसभा निवडणुकीच्या काळात CM देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार. सन्मान योजनेतून १५ हजार रुपये देणार. लाडक्या बहिणींना २१०० देणार. ४५ हजार गावात पाणंद रस्ते बांधणार. शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाची केंद्र सरकारकडून मान्यता घेऊन येऊन. अन्नदाता ऊर्जादाता योजना यांसह अनेक आश्वासने महायुती सरकारने निवडणुकीत दिले पण आता काय झाले ? यावेळी आंदोलकांनी क्या हुआ तेरा वादा असे बॅनर हातात घेत सरकारला प्रश्न केला.

यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, महायुतीच्या घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. त्यांना आश्वासनांचा विसर पडला आहे. गेल्या सात महिन्यांत राज्यात हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तरी आपले अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना आर्थिक वर्षाच्या शेवटी कर्ज भरण्यास सांगितले. शेतकरी सन्मान योजनेची रक्कम १२ हजारांवरून १५ हजार रुपये करण्याचे आश्वासनही पूर्ण झाले नाही. ह्यांनी सोयाबीन आणि कापसाचे भाव कमी करण्यासाठी परदेशातून आयात सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमीभावाच्या दीडपट भाव देण्याची घोषणा केली होती. पण उलट शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किंमतीत कापूस आणि सोयाबीन विकावे लागले. शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असताना ही तो महामार्ग तयार करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. आता शेतकऱ्यांना कोणी वालीच नाही.