Massajog Bypoll Election – मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (santhosh deshmukh) यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी पोटनिवडणुकीचा (By-election) कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 28 एप्रिल रोजी मतदान (Voting) होणार असून 29 एप्रिल रोजी निकाल (Result) जाहीर केला जाणार आहे.
संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण (Kidnapping) करून निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली होती. त्यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले होते. आता गावाचा पुढील कारभारी (Leadership) कोण होणार, याकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अर्ज प्रक्रिया 7 ते 13 एप्रिल (Nomination Process)
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत कार्यक्रमानुसार 7 ते 13 एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज (Nomination Forms) दाखल केले जाणार आहेत. 15 एप्रिल रोजी अर्जांची छाननी (Scrutiny) होईल. इच्छुक उमेदवारांना 17 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची (Withdrawal) मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 28 एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान (Polling) पार पडेल आणि 29 एप्रिल रोजी निकाल जाहीर होईल.
हत्या प्रकरणाचा तपास (Murder Investigation)

पोलीसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात (Charge Sheet) वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार (Mastermind) असल्याचे नमूद करण्यात आले आहे, तर विष्णू चाटेचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. आवादा कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी (Extortion) मागितल्यामुळे निर्माण झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचा तपासात निष्कर्ष (Investigation Finding) काढण्यात आला आहे.
वाल्मिक कराडने विष्णू चाटेचा मोबाईल वापरून आवादा प्रकल्पाचे प्रोजेक्ट मॅनेजर (Project Manager) सुनील केंदू शिंदे यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. तसेच 29 नोव्हेंबर रोजी सुदर्शन घुलेच्या फोनवरूनही खंडणी मागण्यात आली होती.
निर्घृण मारहाण उघड (Brutality Exposed)
संतोष देशमुख यांना गॅस पाईप (Gas Pipe), गाडीच्या वायरचा चाबूक (Wire Whip), लाकडी बांबू (Wooden Stick) आणि लोखंडी पाईप (Iron Rod) अशा शस्त्रांनी अमानुष मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात पाईपचे 15 तुकडे झाले होते. त्यांच्या शरीरावर 150 व्रण (Injuries) आणि 56 गंभीर जखमा (Serious Wounds) आढळल्या.
हल्ल्यात त्यांच्या पाठी, छाती, हात, पाय आणि चेहऱ्यावर वार करण्यात आले होते. तसेच फुफ्फुसालाही (Lungs) गंभीर इजा झाली होती.
मृत्यूचे कारण (Cause of Death)
शवविच्छेदन अहवालानुसार (Postmortem Report) हॅमरेज अँड शॉक ड्यू टू मल्टिपल इंज्युरीज” (Hemorrhage and Shock due to Multiple Injuries) हे मृत्यूचे कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच तीव्र मारहाण, रक्तस्त्राव (Bleeding) आणि मानसिक धक्का (Shock) यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
वाल्मिक कराड शरण कसा आला
वाल्मिक कराड हा घटनेनंतर सुमारे २२ दिवस फरार होता; तो ३१ डिसेंबर रोजी अचानक पुण्यातील सीआयडी कार्यालय (पाषाण रोड) येथे शरण आला. शरण येण्यापूर्वी त्याने एक व्हिडीओ जारी केला होता ज्यात त्याने आपली बाजू मांडली.
व्हिडीओत त्याने सांगितले की, मी वाल्मिक कराड. केज पोलीस ठाण्यात माझ्याविरुद्ध खोटी खंडणीची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा हक्क असतानाच मी आज सीआयडी कार्यालय, पुणे (पाषाण रोड) येथे सरेंडर करत आहे.संतोष भैया देशमुख यांच्या हत्येशी संबंधित जो कोणी मारेकरी असेल त्यांना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी. माझ्यावर राजकीय द्वेषामुळे नाव जोडले जात आहे.
हे देखील वाचा –
1 एप्रिलपासून नवीन प्राप्तिकर कायदा लागू! जुने नियम बदलले; पाहा तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?









