Home / महाराष्ट्र / Mumbai Goa Highway : रखडलेल्या मुंबई-गोवा हायवेला गती! महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सरकारने दिली माहिती

Mumbai Goa Highway : रखडलेल्या मुंबई-गोवा हायवेला गती! महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सरकारने दिली माहिती

Mumbai Goa Highway : गेल्या दीड दशकापासून रखडलेल्या आणि कोकणवासियांसाठी कळीचा मुद्दा ठरलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या (NH-66) कामाबाबत राज्य सरकारने अत्यंत...

By: Team Navakal
Mumbai Goa Highway
Social + WhatsApp CTA

Mumbai Goa Highway : गेल्या दीड दशकापासून रखडलेल्या आणि कोकणवासियांसाठी कळीचा मुद्दा ठरलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या (NH-66) कामाबाबत राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. या महामार्गाचे बहुतांश काम मे 2026 पर्यंत पूर्ण होईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधान परिषदेत केली.

यामुळे दरवर्षी होळी आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

प्रलंबित कामे आणि नवीन डेडलाईन

आमदार निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्र्यांनी सांगितले की, महामार्गाच्या कामाला आता मोठी गती मिळाली आहे. केवळ माणगाव आणि इंदापूर बायपासच्या कामाला थोडा जास्त वेळ लागणार असून, उर्वरित सर्व मार्ग मे २०२६ पर्यंत वाहतुकीसाठी सज्ज होईल.

कोणती कामे कधी पूर्ण होणार?

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावरील महत्त्वाच्या टप्प्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

  1. चिपळूण उड्डाणपूल: या पुलाचे मुख्य काम पूर्ण झाले असून, मे 2026 पर्यंत तो सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला केला जाईल.
  2. हातखंबा (संगमेश्वर) उड्डाणपूल: या पुलाचे काम एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
  3. ताम्हिणी घाट बायपास: माणगाव शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा बायपास मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

कंत्राटदारांच्या हलगर्जीवर कारवाई

प्रवीण दरेकर यांनी या महामार्गाच्या विलंबामुळे होणाऱ्या प्रवाशांच्या हालचालींवरून सरकारला धारेवर धरले होते. यावर उत्तर देताना मंत्र्यांनी कबूल केले की, काही कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे पुलांची कामे लांबली आहेत. अशा कंत्राटदारांवर कारवाई करण्यात आली असून, काही पुलांची कामे 2027 पर्यंत खेचली जाऊ शकतात, परंतु मुख्य रस्ता मे 2026 पर्यंत पूर्ण केला जाईल.

मुंबई-गोवा महामार्ग हा कोकण आणि गोव्याला जोडणारा मुख्य मार्ग आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल आणि प्रवासातील अडथळे दूर होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title:
संबंधित बातम्या