Bacchu Kadu Farmer Protest : प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू सध्या त्यांच्या तीव्र भूमिकांमुळे चांगलेच चर्चेत असल्याचं दिसून येत आहे. कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना सहा हजार रुपयांचे मानधन, तसेच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूनीं (Bacchu Kadu Farmer Protest) हे आंदोलन पुकारले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांनबाबत बच्चू कडू (Bacchu Kadu) हे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.
बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी तसेच प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन (Bacchu Kadu Farmer Protest) सुरू केलं आहे. दरम्यान या आंदोलनकर्त्यांनी नागपूर-वर्धा आणि जबलपूर-हैदराबाद हे महामार्गा रोखून धरले आहेत तसेच यात इतर चार महामार्गाचा देखील समावेश आहे . परिणामी मागच्या १५ तासांहून अधिक काळ अनेक वाहने महामार्गावरच अडकून पडले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या बच्चू कडूंच्या आंदोलनात मात्र सामान्य जनतेची प्रचंड कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.

बच्चू कडूंच्या (Bacchu Kadu Protest) आंदोलनानंतर राज्य सरकारकडूनही हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू” अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या सरकारने अद्याप शेतकऱ्यांना दिलासा दिलेला नाही, सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करावी, अशी प्रबळ मागणी बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आली आहे.
तसेच अतिवृष्टीसारख्या ओढवलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. परंतु अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना लगेचच मिळावी, अशी मागणी बच्चू कडू यांच्याकडून करण्यात येत आहे.
बच्चू कडूंच्या प्रमुख मागण्या –
शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज कोणत्याही अटी शर्ती शिवाय तात्काळ माफ करावे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकऱ्यांचा सात बारा त्वरित कोरा करावा. पिक कर्जा बरोबरच, मध्यम मुदत, पॉली हाउस, शेड नेट, जमीन सुधारणा, सिंचन सुविधांसह सर्व कर्जाचा कर्जमाफीत समावेश करण्यात यावा.
उसाला सन २०२५-२६ या वर्षासाठी ९ टक्के रिकव्हरी साठी प्रति टन ४३००/- रुपये व वर प्रति एक टक्का रिकव्हरीसाठी ४३०/- रुपये एफ.आर.पी. द्या. आजवरची थकीत एफ.आर.पी. रक्कम शेतकऱ्यांना द्यावी.
कांद्याला किमान प्रति किलो ४०/- रुपये भाव द्यवा. कांद्यावरील निर्यातबंदी, किमान निर्यात मूल्य आणि निर्यात कर कायमस्वरूपी बंद करा. भाव पाडण्यासाठी होत असलेला नापेड व एन.सी.सी.एफ.चा वापर बंद करून या संस्थांचा उपयोग शेतकऱ्यांना कांद्याला रास्त दाम मिळवण्यासाठी करावा.
गायीच्या दुधाला किमान ५०/- रुपये बेस रेट आणि म्हशीच्या दुधाला ६५/- रुपये भाव द्या. दुध क्षेत्राला एफ. आर. पी. व रेव्होन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे. दुध भेसळ रोखण्यासाठी ठोस धोरण बनवा.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त देखील तैनात केला आहे. आंदोलनकर्त्यांना वारंवार विनंती करूनही ते मागे हटायला तयार नाहीत. मात्र विनंती केल्यानंतर आंदोलनकर्त्यांना रेल्वे रुळावरून हटवण्यात यश आले.
प्रहार संघटनेच्या या आंदोलनामुळे नागपूर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेला दिसून येत आहे. आता यावर नागपूर खंडपीठात बच्चू कडूनच्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने ६ वाजेपर्यंत रस्ते रिकामे करा असे आदेश दिले.
हे देखील वाचा –









