नागपूर हिंसाचार प्रकरणातील नऊ आरोपींना जामीन मंजूर

Bombay High Court Grants Bail

नागपूर – नागपूरच्या महाल परिसरात १७ मार्च रोजी दोन गटांमध्ये झालेल्या राडा आणि दगडफेकीनंतर दंगल उसळली होती. या हिंसाचार (violence) प्रकरणातील नऊ आरोपींना आज मुंबई उच्च न्यायालयाच्या (Nagpur bench of the Bombay High Court) नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार मोहम्मद फहिम खान (Mohammad Fahim Khan)आणि इतर काही आरोपी अजूनही न्यायालयीन कोठडीत (judicial custody)आहेत.

या दंगल प्रकरणात नागपूर पोलिसांनी एकूण १३ एफआयआर नोंदवले असून, १०० हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली होती.आज जामीन मंजूर झालेल्या ९ आरोपांचे अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली.नागपूर हिंसाचार प्रकरणात या आरोपींचा कुठलाही संबंध नसल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात केला. त्यानंतर न्यायालयाने इक्बाल अन्सारी, एजाज अन्सारी, अफसार अन्सारी, इजहार अन्सारी, इफ्तेखार अन्सारी, अशफाकउल्ला, मुज्जमिल अन्सारी, मोहम्मद राहिल आणि मोहम्मद यासिर या नऊ आरोपींना प्रत्येकी एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन दिला.