नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगाने आज अधिसूचना जारी केली. इच्छुक उमेदवारांना ४ एप्रिलपर्यंत आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
आज उमेदवारी अर्ज भरण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ४ एप्रिल २०२४ रोजी नामांकनांची छाननी केली जाईल. ५ एप्रिल २०२४ उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी पार पडेल. महाराष्ट्रात दुसऱ्याटप्प्यात ८ लोकसभा मतदारसंघात निवडणुका होणार आहेत. यात परभणी, नांदेड, हिंगोली, हे मराठवाड्यातील ३ तर बुलढाणा, अमरावती, वाशीम यवतमाळ, वर्धा, अकोला या पाच मतदारसंघांचा समावेश आहे.
दरम्यान, नियमानुसार उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी स्वतंत्र बँक खाते नव्याने उघडावे. हे खाते उमेदवाराला स्वत:चे नावे किंवा निवडणूक प्रतिनिधीसोबत संयुक्तरित्या काढता येईल. सदर बँक खाते नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या किमान एक दिवस अगोदर उघडलेले असणे आवश्यक असून यात केवळ निवडणुकीशी संबंधीतच व्यवहार करायचे आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात
![](https://navakal.s3.ap-south-1.amazonaws.com/webcontent/2024/03/election.jpeg)