मुंबई- कनिष्ठ न्यायालयातील तीन न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून शिफारस करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्यायाधीश अभय मंत्री, न्यायाधीश श्याम चांडक आणि न्यायाधीश नीरज धोटे यांच्या नावाची शिफारस केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने २७ जून रोजी या न्यायाधीशांच्या नावांची शिफारस केली होती. त्यानंतर सर्वाच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा समावेश असलेल्या कॉलेजियमने १० ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारकडे या तीन न्यायाधीशांच्या नावाची शिफारस केली. या शिफारशींना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. तिन्ही न्यायाधिशांची नियुक्ती झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची संख्या ६९ होणार आहे.
मुंबई हायकोर्टाला तीन नवे न्यायमूर्ती लाभणार
![](https://navakal.s3.ap-south-1.amazonaws.com/webcontent/2023/10/download-4.jpg)