वंजारी-मराठा वाद उफाळणार! जरांगे पाटलांचा संतप्त आरोप

बीड- बीडमधील वंजारी बहुल वस्ती असलेल्या मुंढेवाडी आणि त्या शेजारील एका गावाने 17 मे रोजी गावात बैठक घेऊन मराठा समाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला, मराठा समाजातील व्यक्तींच्या दुकानांतून खरेदी करू नका, त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये जायचे नाही असा निर्णय घेऊन हा आदेश तोडणाऱ्याला पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.
याबाबत मनोज जरांगे-पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, मराठा समाज कुणाच्याही विरोधात नाही, आम्ही आमच्यासाठी ओबीसीत हक्काचे आरक्षण मागत आहोत. मतदानावेळी त्यांनी आमची मते घेतली. आता मतदान झाल्यावर नेत्यांनी हा वाद निर्माण केला आहे. आम्ही मात्र समाजात तेढ निर्माण होऊ देणार नाही. निवडणूक प्रचारावेळी वंजारींचे नेतृत्व करणाऱ्या पंकजा मुंडे यांनी म्हटले होते की, नुसते उपोषण करून काही होत नाही. या वक्तव्यानंतर पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील यांच्यात वाद निर्माण झाला होता.
ठरावाला अनुमोदन नाही
-पोलीस अधीक्षक ठाकूर

मुंढेवाडीतील सभेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आज दुपारी मुंढेवाडीत पोहोचून त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, प्रसिद्ध झालेला व्हिडिओ हा पंधरा-वीस दिवसांपूर्वीचा आहे. गावात तशा प्रकारचा कुठलाही जातीयवाद दिसून आलेला नाही. तशी कुठलीही घटना घडलेली नाही. कुणाला दंडही झालेला नाही. दोन्ही समाजाच्या लोकाची एकमेकांकडे ये-जा सुरू आहे. कुणीही जाणे बंद केलेले नाही. काही समाजकंटक त्रास देतात म्हणून हा ठराव करण्यात आला. परंतु कुणाचेही त्याला अनुमोदन नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top