मुंबई- कर्जात बुडालेले उद्योगपती अनिल अंबानी यांची रिलायन्स कॅपिटल ही मोठी कंपनी शेअर्स बाजारातून बाहेर जाणार आहेत. ही कंपनी शेअर बाजारात ‘डीलिस्ट ‘ होणार आहे.त्यामुळे आता या कंपनीच्या शेअर्सची खरेदी-विक्री बंद होणार आहे. तसेच गुंतवणूकदारही या कंपनीचे शेअर्स ‘होल्ड’ करू म्हणजे आपल्याकडे ठेवू शकणार नाहीत.
सुमारे ४० हजार कोटी रुपयांचे कर्ज असलेली रिलायन्स कॅपिटल ही कंपनी आता हिंदुजा समूहाची कंपनी इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड ही कंपनी ९६५० कोटी रुपयांत विकत घेणार आहे. रिलायन्स कॅपिटलमध्ये सुमारे २० वित्तीय सेवा कंपन्या आहेत. ज्यात सिक्युरिटीज ब्रोकिंग, विमा आणि एआरसी यांचा समावेश आहे. अनिल अंबानींची ही कंपनी ४० हजार कोटींहून अधिक कर्जात बुडाली आहे. प्रचंड कर्जबाजारी असलेल्या या कंपनीच्या शेअर्सचे मूल्य शून्य झाले आहे. याच कारणामुळे रिलायन्स कॅपिटलला शेअर बाजारातून डीलिस्ट करण्यात आले आहे.