आंब्याचे नुकसान झालेल्यांना ३ महिन्यांची व्याजमाफी देणार

नागपूर

कोकणात २०१५ मध्ये अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले होते. या संदर्भात तीन महिन्यांची व्याजमाफी आणि पुनर्गठित कर्जावरील व्याज अशी सुमारे साडे आठ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. त्यामुळे त्यांना व्याजमाफी मिळणार असल्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात सांगितले. कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना व्याजमाफी देण्याबाबत ठाकरे गटाचे नेते सुनिल प्रभू यांनी विचारले असता, त्याला वळसे पाटील यांनी लेखी उत्तर दिले.

यासंदर्भात कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल स्थापन करुन त्यामध्ये कोकण कृषी विद्यापीठ आणि कृषी तज्ञांचा समावेश करण्यात आला नसल्याचे वळसे पाटील यांनी म्हटले. कृती दल स्थापन करण्याबाबतची कार्यवाही कृषि विभागामार्फत सुरु असल्याने अद्याप असे कोणतेही निकष निश्चित केले नाहीत. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात व्याजमाफीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top