आजरा तालुक्यात हत्तीच्या हल्ल्यात वनमजूराचा मृत्यू

कोल्हापूर – वनखात्यातील सुमारे १५ कर्मचारी बाधित क्षेत्र असल्याने जंगल फिरती करण्यास गेले होते.त्यावेळी अचानकपणे झुडपांमध्ये लपलेल्या टस्कर हत्तीने अचानक हल्ला केल्याने वनमजूर प्रकाश गोविंद पाटील (५४) मृत्युमुखी पडले. आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथील जंगलामध्ये काल सकाळी ११ च्या सुमारास घडली. प्रकाश पाटील यांना ‘वनशहीद’चा दर्जा देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे.

गेली १० वर्षे या भागातील हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. गेले आठ दिवस आजरा तालुक्यातील घाटकरवाडी परिसरात एक टस्कर (सुळे असलेला हत्ती) धुमाकूळ घालत होता. या हत्तीला हुसकावण्याची मोहीम काल वनविभाग आणि ग्रामस्थांनी हाती घेतली होती. सकाळी ९ वाजल्यापासून हत्तीला हुसकवण्यासाठी वन विभागातील कर्मचारी प्रयत्न करत…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top