छत्रपती संभाजीनगर- राज्यात शीख समाजासाठी आनंद विवाह कायदा लागू करण्यात आला आहे.मात्र अद्याप त्यानुसार कुणालाही विवाह प्रमाणपत्र दिलेले नाही.त्यामुळे एका शीख दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली होती.या त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश मिळाले असून राज्यातील या विवाह कायद्याचा लाभ मिळविणारे हे पहिले जोडपे ठरले आहे.
सतविंदर कौर आणि अमृतपाल सिंह असे या जोडप्याचे नाव असून दोघेही व्यवसायाने वकील आहेत. राज्यात २३ एप्रिल २०२० रोजीच्या राजपत्रित अधिसूचनेनुसार आनंद विवाह कायदा लागू असूनही आम्हाला या अंतर्गत विवाह प्रमाणपत्र मिळत नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. अखेर त्यांना प्रमाणपत्र मिळाले.विशेष म्हणजे असे प्रमाणपत्र मिळवणारे हे राज्यातील पहिलेच जोडपे ठरले आहे.