भुवनेश्वर-ओडिशा राज्यातील राउरकेला शहरात अतिसाराच्या साथीने थैमान माजवले आहे.शहराच्या विविध भागात अतिसाराच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.हा आजार पसरल्याने आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून १२० हून अधिक रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुंदरगढचे मुख्य जिल्हा वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य अधिकारी धरणी रंजन सत्पथी यांनी सांगितले की,आज रविवारी सकाळपर्यंत राउरकेला शहरात अतिसाराच्या फैलावामुळे गेल्या तीन दिवसांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.तर १२० हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेले. १५ आणि १५ डिसेंबर रोजी प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला.आज रविवारी सकाळी आणखी एका रुग्णाचा अतिसार आजारात मृत्यू झाला.राउरकेला सरकारी रुग्णालयाच्या प्रभारी संचालक सुधराणी प्रधान यांनी सांगितले की, विविध सरकारी रुग्णालयात दररोज ३० हून अधिक अतिसाराचे रुग्ण दाखल होताना दिसत आहेत. त्यांची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. हे रुग्ण उपचाराला प्रतिसाद देईनात. धक्कादायक बाब म्हणजे ही अतिसाराची साथ पसरण्याचा कोणताही स्रोत आढळून आलेला नाही. तरीही हा आजार व्हायरल स्वरूपाचा असावा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे.राउरकेला शहरातील झोपडपट्ट्या आणि आसपासच्या भागात हा आजार पसरला आहे.