कराडच्या घारेवाडी परिसरातील शेतात रानडुकरांचा धुडगूस

कराड

कराड जिल्ह्यातील घारेवाडी परिसरात रानडुकरांनी धुडगूस घातला असून उसासह अन्य पिके भुई सपाट केली आहेत. याकडे शासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन नुकसान भरपाई वाढवून द्यावी, अन्यथा रानडुकरे मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. विंगसह विभागात वन्य प्राण्यांचा उपद्रव्य सुरूच असतो. हे वन्य प्राणी उभ्या पिकांना लक्ष्य करतात. यात खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होते.

विठ्ठलाई डोंगर आणि धुळोबा डोंगर पायथा परिसरातील पिके वन्य प्राणी एका रात्रीत फस्त करतात. यंदा या परिसरात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यातही उपलब्ध पाण्यावर उसासारखी पिके चांगली आली, मात्र वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे उत्पादक हैराण झाले आहेत. रात्री-अपरात्री डुकरांचे कळपच्या कळप शेतात घुसून नुकसान करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अनेकांनी डोंगरालगत ऊस शेती करणे बंद केले आहे. या वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी त्रस्त शेतकरी करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top