काँग्रेसच्या सोशल मिडिया प्रचाराची जबाबदारी सुनील कनुगोलू यांच्याकडे

नवी दिल्ली – २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेसने प्रचाराच्या रणनीतीची धुरा आणि विशेषत: सोशल मिडिया अभियानाची जबाबदारी सुनील कनुगोलू यांच्यावर सोपवली आहे. यापूर्वी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रा तसेच अलीकडच्या तेलंगण विजयामागे कनुगोलू यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
कनुगोलू हे रणनीतीकार आहेत. ते गेल्यावर्षी मे महिन्यात काँग्रेसमध्ये आले. त्यापूर्वी त्यांनी भाजपा अभियानात काम केले होते. २०१४ च्या निवडणुकांच्या वेळी ते रणनीतिकार प्रशांर किशोर यांच्यासोबतही काम करत होते. २०१७ मध्ये त्यांनी उत्तर प्रदेश भाजपासाठी काम करत योगी आदित्यनाथ यांच्या विजयातही महत्त्वाचा वाटा उचलला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या यशामागेही कनुगोलू होते. अलिकडेच त्यांच्या रणनीतीखाली काँग्रेसला तेलंगणा विधानसभेत यश मिळाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top