केंद्र सरकारची तांदळाच्या कोंडा निर्यातीवर बंदी

नवी दिल्ली- केंद्र सरकारने कांद्यापाठोपाठ आता तेल काढलेल्या तांदळाच्या कोंडा निर्यातीवरही ३१ मार्च २०२४ पर्यंत बंदी घातली आहे.दुधाचे आणि पशूखाद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी हा कोंडा निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान,तेल गिरण्यांच्या संघटनेने मात्र कोंडा निर्यातबंदीवर सरकारने पुनर्विचार करावा अशी मागणी केली आहे.

तेल काढलेला भाताचा कोंडा हा जनावरांच्या खाद्यासाठी वापरला जातो जाते.तसेच कुक्कुटपालन व्यवसायातही हा कोंडा कोंबड्यांना खाद्य म्हणून दिला जातो.मात्र सध्या देशात दुधाच्या दरात वाढ होत आहे.तसेच पशूखाद्याच्या दरातही वाढ झाली आहे.त्यामुळे सरकारने कोंडा निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.याआधी जुलै महिन्यातही भाताच्या कोंडा निर्यातीवर बंदी घातली होती. या बंदीचा फारसा परिणाम होणार नाही. त्यामुळे या निर्यात बंदीचा सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी तेल गिरण्यांच्या संघटनांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top