खंडग्रास चंद्र ग्रहणात विठुराया-रुक्मिणी मातेला चंद्रभागेचे स्नान

पंढरपूर – या वर्षातील शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण शनिवारी रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी सुरू झाले. ते पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी संपले. तीस वर्षानंतर पहिल्यांदाच पौर्णिमेनंतर ग्रहण झाले. ग्रहणकाळात पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील धार्मिक विधी आणि पूजा बंद होत्या. त्याबरोबर नित्यपचारांमध्येही बदल करण्यात आले होते. ग्रहणाच्या वेधकाळात विठुराया आणि रुक्मिणी मातेला चंद्रभागेवरून पाणी आणून पहिले स्नान घालण्यात आले. रात्री एक वाजता चंद्रभागेवरून पाणी आणून पहिले स्नान घालण्यात आले. मोक्ष ग्रहणानंतर दुसरे स्नान घालण्यात आले. त्यानंतर पहाटे चार वाजता काकड आरती झाली. सकाळी सहा वाजता भाविकांसाठी मंदिर चरण स्पर्श दर्शनासाठी खुले करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top