मुंबई :
काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम संरक्षण वाढवून दिले आहे. भाजप नेते महेश श्रीश्रीमल यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात गांधी यांना हा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गिरगाव न्यायदंडाधिकाऱ्यांनी या फौजदारी प्रकरणाची कारवाई पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत. हे अंतरिम संरक्षण २३ जानेवारी २०२४ पर्यंत वाढवण्यात आले आहे.