गोडवली ग्रामस्थांचा पाचगणी सांडपाणी प्रकल्पाला तीव्र विरोध

पाचगणी- महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली गावच्या हद्दीत पाचगणी नगर परिषदेच्या सांडपाणी प्रकल्पाचे काम सुरू आहे. परंतु या प्रकल्पामुळे गोडवली गावच्या पाणीपुरवठा विहिरीचे आणि आजुबाजुच्या विहिरींचे पाणी दूषित होण्याची शक्यता असल्याने या प्रकल्पाला गोडवली ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. याबाबतच्या मागणीचे एक निवेदन ग्रामस्थांनी पाचगणी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.

या प्रकल्पाचे काम गोडवली गावातील पाणीपुरवठा विहिरीच्या अगदी ५० ते १०० मीटरवर सुरू आहे. तसेच इतर शेतकर्‍यांच्या १५ विहिरीही याच परिसरात आहेत.त्यामुळे या विहिरींचे पाणी दूषित होऊन दुर्गंधी पसरून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. हे काम दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी करावे, अशी मागणी या ग्रामस्थांनी या निवेदनाद्वारे केली आहे. तसेच आपल्या मागणीचा सकारात्मक विचार केला नाही तर ग्रामस्थ उग्र आंदोलन छेडतील, असा इशाराही या ग्रामस्थांनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top