मुंबई – गोवंडी येथे झोपडपट्टीला पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये २५ ते ३० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारण समजू शकले नाही.