चेन्नई
मिचौंग वादळाचा परिणाम आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पदुचेरी येथील किनारी भागाला जाणवू लागला आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाने संपूर्ण राज्याला जोडले. चेन्नई विमानतळावर पाणी साचल्याने सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. शिवाय येथील सबवे देखील पाण्याखाली गेल्याने संपूर्ण राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, आज आणि उद्या मिचौंग वादळामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. यामुळे सरकारी यंत्रणा, प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. सामान्य नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. आंध्रप्रदेशातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, मिचौंग चक्रीवादळाचा वेग ताशी १३ किलोमीटर आहे. हे चक्रीवादळ दक्षिण-पश्चिमेकडून बंगालच्या उपसागरात उत्तर-पश्चिमेकडे निघाले आहे.