ठाणे – जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यातील जलजीवन योजनांची कामे ठप्प झाली असल्याने आतापासूनच नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
या तालुक्यातील ५० टक्के परिसर हा आदिवासींचा असून त्यामध्ये ६० ग्रामपंचायती येतात. तालुक्यात १४ तलाव आणि बंधारे आहेत. दरवर्षी मृद व जलसंधारण कोकण विकास महामंडळातर्फे मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला जातो. मात्र त्याचा फायदा मुरबाड तालुक्यातील जनतेला पाणीटंचाई दूर करण्यासाठी मात्र काही झालेला नाही. आतापर्यंत पाणीपुरवठा योजनेसाठी अनेक निविदा काढण्यात आल्या आहेत. तरीही जलजीवन योजनेची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे यंदा आत्ताच या तालुक्याला पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत.