औरंगाबाद- राज्यात सर्वात मोठे धरण असलेल्या मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. प्रखर उन्हामुळे धरणातील पाण्याचे वेगाने बाष्पिभवन होत असल्याने पाणीसाठी कमी होत चालला आहे.शनिवारी तर या धरणातील पाणीसाठी अवघा ९.८० टक्के एवढा खाली गेला होता. मागील वर्षी या काळात धरणातील पाणीसाठा ५०.५८ टक्के होता.
पाणीसाठा एवढा खाली गेल्याने छत्रपती संभाजीनगरसह पैठणला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपहाऊसला आपत्कालीन पंपाने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. एप्रिल महिना संपायला अजून दोन दिवस आहेत. त्यानंतरचा मे महिना हा आणखी तीव्र उन्हाचा असणार आहे. साहजिकच धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेगही वाढणार आहे