मुंबई- गेल्या काही महिन्यांपासून जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यातील तब्बल १७ लाख सरकारी कर्मचारी आक्रमक झालेले दिसत आहे.आता पुन्हा एकदा या कर्मचार्यांनी संपावर जाण्याची जय्यत तयारी केली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय उद्या २१ ऑक्टोबर रोजी होणार्या सरकारी, निमसरकारी,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या बैठकीत होणार आहे,अशी माहिती समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी दिली.
विश्वास काटकर म्हणाले की, सरकारने आजपर्यंत आमच्या १८ पैकी एकाही मागणीवर विचार केलेला नाही.आता उद्या होणार्या बैठकीत सरकारकडून होत असलेली टाळाटाळ,विविध खात्यातील कंत्राटी भरती, शिक्षण खात्यातील संभाव्य खासगीकरण तसेच कलम ३५३ मधील सुधारणांमुळे वाढलेली दडपशाही आदी मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे.तसेच या सर्व बाबींचा मागणीपत्रात समावेश केला जाणार आहे.