झारखंडमध्ये दांडी बहादूर विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम

रांची
शाळेत महिन्याहून अधिककाळ गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी झारखंडच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने ‘प्रयास-सिटी बजाओ, स्कूल बुलाओहा अनोखा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमात शाळा सुरू होण्याच्या वेळेला गावात शिट्टी वाजवून सर्व विद्यार्थ्यांना सूचित केले जात आहेत. झारखंडमधील पूर्व सिंगभूम जिल्ह्यातील पोटका परिसरात येणाऱ्या तांग्रेनमधील सरकारी माध्यमिक शाळेने काही दिवसांपूर्वी या उपक्रमाची अंमलबजावणी केली. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीतही वाढ झाली. शिट्टीच्या आवाजामुळे शाळेत महिन्यापेक्षा अधिक काळ अनुपस्थित असणारे अनेक विद्यार्थी पुन्हा शाळेत येऊ लागले, अशी माहिती शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अरविंद तिवारी यांनी दिली. अरविंद तिवारी म्हणाले की, या उपक्रमाला आमच्या शाळेत विद्यार्थ्यांचा मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन झारखंडच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये तो राबविण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी शाळेत आल्यानंतर सोशल मीडियावर शिट्टी वाजविणाऱ्या विद्यार्थ्याचे छायाचित्र ‘सिटी बजाओ या हॅशटॅगसह शेअर करण्याच्या सूचनाही विभागाने दिल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top