डोंबिवली पश्चिमेकडील बससेवा बंद असल्याने नागरिकांत असंतोष

डोंबिवली – घाटकोपर स्थानकाच्या धर्तीवर डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर पश्चिम बाजूला बसथांबा असूनही बसेस धावत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. बसेस नसल्याने नागरिकांना रिक्षाशिवाय पर्याय उरलेला नाही. २०१४ साली शिवसेनेचे भाऊसाहेब चौधरी हे परिवहन समितीचे सभापती असताना डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर पश्चिम बाजूला बसथांबा उभारून बससेवा सुरू करण्यात आली होती. ही बससेवा फायद्यात चालली होती. सायंकाळी कामावरून येणार्‍या नागरिकांना तर या बससेवेचा चांगला लाभ घेता येत होता. या बससेवेतून परिवहनच्या तिजोरीत बर्‍यापैकी भर पडत होती. मात्र या बससेवेचा फटका रिक्षा व्यावसायिकांना बसत असल्याची ओरड सुरू झाली आणि कालांतराने ही बससेवा अचानक बंद पडली. तेव्हापासून ही बससेवा बंदच आहे. ही बससेवा पुन्हा सुरू करावी अशी मागणी स्थानिक करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top