मुंबई- बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची तब्येत बिघडल्याने त्यांना विरारमधील प्रकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांची तब्येत स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर भवर यांनी सांगितले.वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या घशाला झालेला संसर्ग आणि अतिश्रम यामुळे त्यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हितेंद्र ठाकूर हे बोईसरचे आमदार राजेश पाटील यांचा पालघर लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित नव्हते.त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु होत्या.मात्र त्यावर पडदा पडला आहे.त्याचे खरे कारण समोर आले आहे. दोन दिवसापूर्वीच हितेंद्र ठाकूर यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी त्यांची डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यानुसार ते रुग्णालयात दाखल झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.